ऊर्जेच्या स्त्रोतांवर, खनिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीवर ज्यांचे नियंत्रण राहील ते जगावरही नियंत्रण ठेवू शकतात. तेच लोक पृथ्वीवरील फुकटात उपलब्ध असलेल्या मटेरियल गोष्टींना बळकावून आपल्या इवल्याशा क्षणभंगुर जिवनात शक्तिशाली बनू इच्छितात, भलेही कितीही जिवितहानी होवो. काहींना जमेल त्या मार्गाने, वेळ पडल्यास मानवाला जबरदस्तीही करून एकच अल-इल्लाह चे शासन प्रस्थापित करायचे आहे. ईश्वराकडे पोहोचण्याचा एकच मार्ग अन्य कोणताही नसतो म्हणून शून्य उपद्रव करणाऱ्यांनाही तुमचा मार्ग चुकला असे बजावून आपल्यासारखे करून घेणे आणि ह्या कार्याला दैवी मानून मानवाचे स्वतंत्र बुद्धीच्या वापराचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे. कशासाठी? तर - सर्वांना स्वर्गात जाता यावे हा विचार अमलात आणण्यासाठी! यातही जिवितहानीची पर्वा केल्या जात नाही. सध्या सुरू असलेल्या इस्रायल - अमेरिका - इराण युद्धाचे दोन महत्त्वाचे पैलू म्हणजे साम्राज्यशाही आणि अब्राहमिक धर्मवाद आहे. सुमारे अडिच हजार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. त्या घटनेचे नाव " महाभिनिष्क्रमण " म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. महाभिनिष्क्रमण ह्या शब...